Thursday, September 24, 2009

विरह

करुनी ओळख यजमानाशी
घाव घातला मज हृदयाशी
जे झाले वाजवुनी सनई ताशे
कशाला हवे ते खोटे नाते
जीवनाची झाली आता माती
आठवणीने झुरणे राहिले हाती
पौर्णिमेच्या रात्रि नदी काठी
आठवते तुझी ती गुलाबी मीठी
दिसताच फुल तुझ्या आवडीचे
गंधा बरोबर येते उछवास स्मुतिचे
दिसले नसतील माझे अश्रु लग्नवेळी
होते नयन तुझे जाईजूई फुली
निरोप देताच अश्रुतुन घराचे
गणित केवल मीच करू जाणे
किती होते माहेरच्या वियोगाचे
किती होते ह्रदय चिरनऱ्या विरहाचे
दिलास निरोप मला हात हलवुनी
मी बोलत होतो "अश्रुच्या भाषेतुनी"
 
Kavi : Arun

No comments:

Post a Comment