Thursday, September 24, 2009

माझे मन

आज मला काय होतय.. तेच काळात नव्हते..
कारण जे काही होतय ...ते माझ्या हातात नव्हते.||

सर्वा पुर्वी सारखे सुरळित आणि छान चालू होते...
कुठे तरी चुकतय.....असे मात्र उमगत होते...||

माझ्या मनाच्या विश्वात एकच कोलाहल चालू आहे.
पण का? कारण काय? तेही अजुन अंधारात आहे.||.

कधी वाटते हसावे..तर कधी वाटते रादावे..
कदाचित हे सगळे मनाचेच भास असावे||

कारण घडताय..चुकतय....ते प्रत्यक्षात आहे.
खूप विचार केला.. पण साला तोही व्यर्थ आहे||

बराच हिंडलो आनवणी वेड्या सारखा..एका हरवलेल्या उजेडाच्या शोधात..
सगळे सापडले पण जे पाहिजे तेच होते गायब या जगात||

मनाला दोष देऊन चालत नव्हते..असेही त्याची तर चुकी दिसत नव्हती.
कारण अंधारात उजेडला शोधण्याची त्याची धडपड मला दिसत होती||

माझी विचार करण्याची क्षमता ..मला आज दिसत होती
आणि दिसाण्या वरुन तरी ती खूपच लवकर संपत होती||

एवढा असूनही परिस्थितीचे उत्तर सापडत नव्हते..
आज मला गप्पा बसण्या वाचून गत्यंतर नव्हते ||

Kavi : डॉ जय

No comments:

Post a Comment