आज मला काय होतय.. तेच काळात नव्हते..
कारण जे काही होतय ...ते माझ्या हातात नव्हते.||
सर्वा पुर्वी सारखे सुरळित आणि छान चालू होते...
कुठे तरी चुकतय.....असे मात्र उमगत होते...||
माझ्या मनाच्या विश्वात एकच कोलाहल चालू आहे.
पण का? कारण काय? तेही अजुन अंधारात आहे.||.
कधी वाटते हसावे..तर कधी वाटते रादावे..
कदाचित हे सगळे मनाचेच भास असावे||
कारण घडताय..चुकतय....ते प्रत्यक्षात आहे.
खूप विचार केला.. पण साला तोही व्यर्थ आहे||
बराच हिंडलो आनवणी वेड्या सारखा..एका हरवलेल्या उजेडाच्या शोधात..
सगळे सापडले पण जे पाहिजे तेच होते गायब या जगात||
मनाला दोष देऊन चालत नव्हते..असेही त्याची तर चुकी दिसत नव्हती.
कारण अंधारात उजेडला शोधण्याची त्याची धडपड मला दिसत होती||
माझी विचार करण्याची क्षमता ..मला आज दिसत होती
आणि दिसाण्या वरुन तरी ती खूपच लवकर संपत होती||
एवढा असूनही परिस्थितीचे उत्तर सापडत नव्हते..
आज मला गप्पा बसण्या वाचून गत्यंतर नव्हते ||
Kavi : डॉ जय
Thursday, September 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment